प्रत्येकाला आयुष्यात केव्हा ना केव्हा तरी प्रेरणादायी विचारांची गरज असते…. तुमच्या साठी हा खास प्रेरणादायी विचारांचा Marathi Thoughts खजिना…
“ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका, स्वप्न मनात धरलेलं कधीच मोडू नका. येतील कठीण प्रसंग फक्त चंद्र तारकांना स्पर्श करून जिंकण्यासाठी जमिनीला सोडू नका”
जीवन हा एक पाण्याचा प्रवाह आहे, समुद्र गाठायचा असेल, तर खाचखळगे पार करावे लागतील
Marathi thoughts
कर्मावर माणसाचा अधिकार आहे, मात्र फळ कधी मिळणार हे त्याच्या हातात नाही. कर्माचे फळ कर्मातच असल्यामुळे माणसाने फळाची अपेक्षा न ठेवता काम करत राहावे
माणसानं कस समुद्रासारखं असाव अथांग भरतीचा माज नाही अन् ओहोटीची लाज नाही
अंघोळ केल्याने शरीर स्वच्छ होते तर वाचन केल्याने मन स्वच्छ होते
जोपर्यंत आपण हरण्याचा विचार करत नाही तोपर्यंत आपल्याला कोणीही हरवू शकत नाही. हे एकदा मनाशी पक्के केले की आपण जिंकणार हे नक्की
Marathi Thoughts
संघर्षातून अस्तित्व निर्माण झाले की आयुष्य जगण्यात एक वेगळाच रुबाब येतो आणि रुबाब हा विकत घेता येत नाही अन् दाखवता पण येत नाही तो व्यक्तिमतातून सिद्ध होतो
कठिण काळात सतत स्वतःला सांगा शर्यत अजून संपलेली नाही कारण मी अजून जिंकलेलो नाही
यश मिळवण्यासाठी जेवढी मेहनत करावी लागते त्यापेक्षा दुप्पट मेहनत ते टिकवण्यासाठी करावी लागते
जीवनामध्ये आपली तुलना, कधीच कुणाशी करू नका तुम्ही जसे आहात तसेच सर्वश्रेष्ठ आहात कारण देवाची प्रत्येक रचना ही सर्वोत्तम आणि सर्वश्रेष्ठ आहे
पायाला पाणी न लागता पण कुणी समुद्र पार करू शकतो पण माणसाचे आयुष्य अश्रू शिवाय पार करता येत नाही यालाच खरे आयुष्य म्हणतात.
झाडाखाली ठेवलेल्या तुटलेल्या मूर्तीला बघून कळलं की, स्वतःला कधी तुटू द्यायचं नाही हे जग तुटलेल्या देवाला बाहेर काढू शकत तर आपली काय लायकी
विश्वास ठेवा… आपण जेव्हा कोणासाठी तरी चांगलं करत असतो, तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काही चांगलं घडत असतं इतकीच की ते आपल्याला दिसत नाही
ज्याप्रकारे लिंबाचा रस हजारो लिटर दूध नासवतो, त्याच प्रकारे माणसाचा अहंकार सुद्धा चांगली नाती नासवतो…
स्वप्न मोफतच असतात, फक्त त्यांचा पाठलाग करतांना आयुष्यात बरीच किंमत मोजावी लागते.
जिंकण्याची मजा तेव्हाच येते जेव्हा सर्वजण तुमच्या हरण्याची वाट पाहत असतात
जसे आहात तसेच रहा… नेहमी लोकांच्या आवडीनुसार बदलायचा प्रयत्न केला तर आयुष्य कमी पडेल
कुठेही बोलतांना आपल्याशब्दाची उंची वाढवा आवाजाची उंची नको,कारण पडणाऱ्या पावसामुळे शेती पिकते विजेच्या कडकडाटामुळे नव्हे.
“संकटाचे हेही दिवस जातील संयम ठेवा..आज जे तुम्हाला हसतात ते उद्या तुमच्याकडे पाहतच राहतील.”
तुमच्या स्वप्नांना कधीही सांगू नका तुम्हाला किती अडचणी आहेत पण तुमच्या अडचणींना हे नक्की सांगा की तुमची स्वप्ने खुप मोठी आहेत
छत्री पावसाला थांबवू शकत नाही… पण पावसात थांबण्याचे धाडस नक्की देऊ शकते, तसेच आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही… पण संघर्ष करण्याची प्रेरणा नक्की देऊ शकतो.